Posts

कर्करोग रुग्णांसाठी श्री साईनाथ रुग्णालयात मोफत हाडांची घनता तपासणी शिबिर..*

Image
शिर्डी (प्रतिनिधी)-- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने कर्करोग रुग्णांसाठी विशेष मोफत हाडांची घनता (Bone Mineral Density - BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्करोगावरील उपचारा दरम्यान, विशेषतः हार्मोनल थेरपी व केमोथेरपीमुळे हाडांची घनता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन फॅक्चरचा धोका वाढू शकतो. हा धोका वेळीच ओळखून योग्य उपचार व प्रतिबंधात्मक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  शिबिरामध्ये BMD (Bone Mineral Density) तपासणीद्वारे हाडांची घनता तपासणे, हाडे ठिसूळ होण्याचा धोका लवकर ओळखणे, योग्य उपचार व प्रतिबंधात्मक सल्ला देणे तसेच हाडांचे आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ कर्करोग तसेच हार्मोनल थेरपी किंवा केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांना घेता येणार आहे. शिबिरासाठी नोंदणी पूर्णपणे मोफत असून, नोंदणीसाठी आधारकार्ड, लागू अ...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. सुहास सदाफळ यांची रसायनशास्त्र विषयात पीएच.डी.जिद्द, संघर्ष अन् यशाची भरारी!

Image
शिर्डी ( प्रतिनिधी)- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर डॉ. सुहास वैशाली अशोक सदाफळ यांनी एमजीएम विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे सदाफळ कुटुंबासह कोपरगाव परिसराचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव वाढला आहे. अनेक अडचणींचा सामना करत असतानाही डॉ. सुहास सदाफळ यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आणि आपल्या जिद्द, आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांचा हा संघर्षमय शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यांच्या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक डॉ. गवई जे. जी. तसेच सहमार्गदर्शक डॉ. सपकाळ एस. बी. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. मजगे सर व डॉ. शिंगारे सर यांचेही मार्गदर्शन मिळाले. पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास एस. सपकाळ आणि डॉ. प्राप्ती देशमुख यांच्या हस्ते डॉ. सुहास सदाफळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य डॉ. विजया मुसांड...

शिर्डीत दि.13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत श्री साई सतचरित्र पारायण सोहळा! विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन!

Image
शिर्डी (प्रतिनिधी)- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दिनांक १३ ऑगस्‍ट, २०२६ ते गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट २०२६ या कालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास येथील शताब्‍दी मंडपात श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करणेत आले असून या सोहळ्या दरम्‍यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.  श्रावणमासा निमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हजारो पारायण वाचकांच्‍या उपस्थितीत साजरा करण्‍यात येणार आहे. या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, सर्व सांस्‍कृतिक कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. पारायण सोहळ्याचे हे ३२ वे वर्ष असून सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत (पुरुष वाचक) व दुपारी ०१.०० ते ...

112 वर खोटा कॉल केला श्रीरामपुरात गुन्हा दाखल...

Image
दिलीप लोखंडे  टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर गावातील ग्रामस्थ दादासाहेब संजय शिंदे याने दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, आरडाओरडा केला.  तसेच 112 या पोलीस सहायता क्रमांकावर खोटा कॉल करून या यंत्रणेच्या कामकाजात सुविधा निर्माण केली आणि कर्तव्यावरील पोलिसाशी हुज्जत घातली म्हणून पोलीस शिपाई उंडे यांच्या फिर्यादीवरून दादासाहेब विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुका पोलीस निरीक्षक श्री. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाबर पुढील तपास करीत आहेत.

आदिवासी व वंचित समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे सूर्योदय परिवाराचे कार्य कौतुकास्पद : सरसंघचालक मोहन भागवत

Image
 { सूर्योदय पारधी-आदिवासी आश्रम विद्यालयातील ऑडिटोरियम व अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे लोकार्पण } कोल्हार प्रतिनिधी :- वंचित आणि आदिवासी समाजातील मुलांना शिक्षण, संस्कार, क्रीडा व कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर आणि उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याचे कार्य सूर्योदय परिवाराकडून सातत्याने सुरू आहे. या कार्यातून अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात आले असून, हा उपक्रम समाज परिवर्तनाच्या दृष्टीने प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनराव भागवत यांनी केले.  बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील श्री.सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्टद्वारे संचालित सूर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रम विद्यालय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या भव्य ऑडिटोरियम तसेच तीन अत्याधुनिक क्रीडांगणांनी सुसज्ज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे लोकार्पण श्री.मोहनराव भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, कामगार मंत्री आकाश फुंडकर, भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी संघटन मंत्री आशुतोष तिवारी, देवासचे खासदार म...

शेतकरी संघटनेचा दणका, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खाती अवकाळी अनूदान जमा

Image
टाकळीभान प्रतिनिधी : शेतकरी संघटनेने रब्बीच्या अवकाळी अनुदाना संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. इशारा देताच नेवासा तालुक्यातील शेतकर्यांच्या खाती अनुदान जमा झाले आहे. ४ ऑगस्ट २०२६ रोजी शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष, विधी तज्ञ ड. अजित काळे यांचे नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय बिराजदार यांची शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका पदाधिकारी यांनी भेट घेवून मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा गहू हरभरा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते पंचनामे होऊन देखील शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तरी लवकरात लवकर शेतकर्यांच्या खाती अनूदानाची रक्कम जमा करण्याची मागणी केली असता तहसीलदारांनी त्याची दखल खात्यावर घेऊन शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाल्यामुळे शेतकरी वर्गातून नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे व तहसीलदार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष करून शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष ड अजित का...

पारनेर तालुका दुष्काळमुक्त करण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू आहे.पालकमंत्री .ना. राधाकृष्ण विखे पाटील

Image
पारनेर दि.९ प्रतिनिधी कुकडी प्रकल्पातील पाण्याची तूट भरून काढायची असेल अतिरीक्त पाणी निर्माण करावे लागणार आहे.महायुती सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करीत असून, राज्यामध्ये दुष्काळ आता भूतकाळ ,होईल असा विश्वास जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. कुकडी लाभक्षेत्रातील डाव्या कालव्याच्या नूतनीकरणाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जवळा येथे करण्यात आले.आ.काशिनाथ दाते यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.तालुक्यातील गांजी भोयरे येथे रस्ते विकासाचे लोकार्पण करण्यात आले. आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,पारनेर तालूका दुष्काळमुक्त करण्याचे काम जलसंपदा विभागाच्या माध्यमातून सुरू झाले आहे.यापुर्वी सहा उपसा सिंचन योजनांना मंजूरी दिली असून पाण्याची उपलब्धता होईल त्या पध्दतीने सर्व उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून लाभक्षेत्रातील गावांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून कालव्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेतल्यामुळे कालव्याचे संरक्...